- Advertisement -
राजीव गांधी फाऊंडेशनचा परवाना रद्द करून केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला धक्का दिला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनचे परदेशातून फंड घेण्याचा परवाना रद्द करण्यात आलाय. या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये झाली होती. या फाऊंडेशनची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाने आंतर- मंत्रालयीन समिती स्थापन केली होती. राजीव गांधी फाऊंडेशनची स्थापना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे व्हिजन पूर्ण करण्याच्या उद्देशातून करण्यात आली होती. या फाऊंडेशनने आरोग्य, साक्षरता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर काम केले आहे.
- Advertisement -