घरव्हिडिओसरकारने केलेला हा खून आहे -संजय राऊत

सरकारने केलेला हा खून आहे -संजय राऊत

Related Story

- Advertisement -

पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृण हत्या झाली. हा पत्रकार कोकणातल्या रिफायनरी विरोधात अनेक प्रश्न घेऊन आवाज उठवत होता. तसेच, रत्नागिरीत काही रिफायनरी समर्थक राजकारण्यांचा या जमिनी घेण्यात कसा हातभार आहे, यासंदर्भात त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. पण ते या भागातल्या राजकारण्यांच्या डोळ्यात खूपत होते. आंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या गेल्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीशे यांची हत्या झाली. अशातच आता शशिकांत वारीशे यांचा मुद्दा उचलणाऱ्या संजय राऊतांना देखील धमकीचे फोन आले.

- Advertisement -