- Advertisement -
देशात भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीवर चर्चा सुरु झाली आहे. परंतु या भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व कोण करणार यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान काँग्रेसविना तिसरी आघाडी असेल असे वक्तव्य केलं आहे. तसेच युपीए अस्तित्वात राहिली नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. यावरुन काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र नेतृत्वावरुन भाजप आणि काँग्रेसने ममतांवर निशाणा साधला आहे. या आघाडी नेतृत्व राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार की ममता बॅनर्जी करणार? यावरुन वादंग सुरु आहे.
- Advertisement -