देशभरातील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील एका धार्मिक समूहाच्या मुख्यालयात गेलेल्या हजारो लोकांना शोधून काढले आहे. दिल्लीचा निजामुद्दीन भाग कोरोनाचं केंद्र बनले आहे. कमीतकमी आठ मृत्यू आणि ११७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तबलीगी जमातीच्या सहा मजली इमारत कोरोनाचे केंद्र बनले आहे. .
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कार्यक्रमाचा घटनाक्रम:
१३ मार्च: निजामुद्दीन मार्कझ येथे झालेल्या धार्मिक मेळाव्यात भाग घेण्यासाठी सुमारे ३,४०० लोक एकत्र आले
१३ मार्च: दिल्ली सरकारने त्याच दिवशी ३१ मार्चपर्यंत दिल्लीत २०० हून अधिक लोकांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय मेळाव्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश दिले होते. या आदेशानंतरही तबलीगी जमात एकत्र आले.
१६ मार्च: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपाययोजनांवर आणखी कडक कारवाई करण्याची घोषणा केली, तसेच कोरोनव्हायरसच्या पार्श्वभूमीवर ५० हून अधिक लोक एकत्रित होऊ देणार नाहीत अशी सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आली. तथापि, मार्काझमधील लोक तिथेच राहिले होते.
हेही वाचा – खूशखबर: कोरोनाच्या जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रूग्णांवर यशस्वी उपचार
२० मार्च: या कार्यक्रमात उपस्थित १० इंडोनेशियन लोक तेलंगणामध्ये कोरोना पॉझिटीव्ह आले.
२२ मार्च: जनता कर्फ्यू जाहीर
२३ मार्च: १५०० लोकांना मार्कझमधून खाली केले.
२४ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउन जाहीर केले.
२५ मार्च: सुमारे 1000 लोक मार्कझवर होते. जमातचे अधिकारी एसडीएमच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज दाखल केला.
२६ मार्च: मेळाव्यास आलेल्या एका उपदेशकाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आणि त्यांचे श्रीनगर येथे निधन झाले.
२६ मार्च: एसडीएमने मार्कझला भेट दिली आणि जमात अधिकाऱ्यांची डीएमसमवेत बैठक बोलावली.
२७ मार्च: कोरोना व्हायरसच्या सहा संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी मार्कझपासून दूर नेले आणि नंतर त्यांना हरियाणाच्या झज्जरमध्ये अलग ठेवण्यात आले.
२८ मार्च: एसडीएम आणि डब्ल्यूएचओची टीमने मार्कझला भेट दिली आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेतलेल्या ३३ लोकांना राजीव गांधी कर्करोग रुग्णालयाच्या अलगाव वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.
२८ मार्च: एसीपीने (लाजपत नगरातील) मार्कझला रिकामे करण्याची नोटीस पाठविली
२९ मार्च: एसीपीच्या पत्राला उत्तर देताना मार्कझमधून सांगितले की देशभरात लॉकडाऊन घोषणेनंतर कोणतेही नवीन लोक एकत्र आलेले नाहीत. मार्कझमध्ये जमलेला जमाव हा लॉकडाऊन होण्यापूर्वी जमा झाला होता आणि पंतप्रधानांनी लॉकडाऊन भाषणात “जो जहां है वही रहे (तुम्ही जिथे आहात तिथेच राहा),” असे सांगितले.
२९ मार्चच्या रात्रीपासून: दिल्ली पोलिस आणि आरोग्य अधिकारी मार्कझमधून लोकांना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात व क्वारंटाईनसाठी पाठवले.
३१ मार्च: निजामुद्दीन मार्काझ येथून सायंकाळपर्यंत १,५४८ लोकांना बाहेर काढण्यात आले.