घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये ऑक्टोबरपर्यंत २०० दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये ऑक्टोबरपर्यंत २०० दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. 2019 मध्ये 157 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात भारतीय जवानांना यश आले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात 28 दहशतवादी मारले गेले. तर जुलै आणि ऑक्टोबरमध्ये 21 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या. ज्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत 138 दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी 200 मधील 190 दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ठार मारले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात अत्यंत वेगाने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरलाही ठार करण्यात आले आहे. सैफुल्लाह असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -