घरदेश-विदेशSarabjit Singh : सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; अज्ञात हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या

Sarabjit Singh : सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; अज्ञात हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या

Subscribe

लाहोर तुरुंगात असताना सरबजीत सिंगवर अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याने हल्ला करत त्याची हत्या केली होती. यानंतर आज अमीर सरफराज याची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घात हत्या करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : पंजाबमधील येथील शेतकरी सरबजीत सिंग चुकून पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र त्यांच्यावर खोटो आरोप लावत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. लाहोर तुरुंगात असताना सरबजीत सिंगवर अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याने हल्ला करत त्याची हत्या केली होती. मात्र पुरव्याअभावी अमीर सरफराज याची 2018 मध्ये सुटका करण्यात आली होती. यानंतर आता अमीर सरफराज याची आज (14 एप्रिल) अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घात हत्या करण्यात आली आहे. (Assassination of Sarabjit Singh in Pakistan Shots unknown assailants fired)

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावातील शेतकरी सरबजीत सिंग 30 ऑगस्ट 1990 रोजी चुकून पाकिस्तानात गेला होता. तेथे पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. पाकिस्तानने सरबजीतवर खोटे खटले लादले आणि लाहोर आणि फैसलाबादमधील बॉम्बस्फोटांमध्ये सरबजित सिंगचा हात असल्याचा आरोप केला. बॉम्बस्फोटात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आणि सरबजीतला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरबजीतची बहीण दलबीर आणि पत्नी सुखप्रीत यांच्याशिवाय भारत सरकारनेही सरबजीतला भारतात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.

- Advertisement -

पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात असताना सरबजीतवर 2013 मध्ये गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याने प्राणघातक हल्ला केला होता. यात सरबजीत याला आपले प्राण गमवावे लागले. तुरुंगात शिक्षा भोगत असताना सरबजीतच्या डोक्यात विटांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अमीर सरफराज आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पुराव्याअभावी 2018 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यानंतर आज अमीर सरफराज याची हत्या करण्यात आली आहे.

RAW ने परदेशात मारले 20 दहशतवादी

दरम्यान, गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये भारताचे अनेक दहशतवादी शत्रू एकामागून एक ठार होत आहेत. अज्ञात हल्लेखोरांकडून दहशतवाद्यांची हत्या करण्यात येत आहे. अलीकडेच ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या अहवालात दावा केला होता की, 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्था रॉ ने परदेशात 20 लोकांना मारले आहे. नवी दिल्लीने भारताला शत्रू मानणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले असल्याचेही द गार्डियनने म्हटले होते. यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही दावा केला होता की, दहशतवाद्यांची हत्या यूएईमधून कार्यरत असलेल्ल्या भारतीय गुप्तचर स्लीपर सेलकडून होत आहे. मात्र भारत सरकारने दोघाचेही दावा फेटाळून लावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -