घरदेश-विदेशBJP : हिंदुत्वास बदनाम करण्याचा अपराध करणारे हेच लोक..., ठाकरे गटाचे भाजपावर...

BJP : हिंदुत्वास बदनाम करण्याचा अपराध करणारे हेच लोक…, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : देशात द्वेष, खोटारडेपणा, धर्मभेद पसरविण्याचे काम भाजपाचा ‘आयटी सेल’ करते. राजकारणातील प्रमुख नेते – मग ते राहुल गांधी असोत, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू यादव असोत – त्यांच्या विरोधात अपप्रचार आणि अफवा पसरवण्याचे काम हेच सडक्या डोक्याचे लोक करतात. हिंदुत्वास बदनाम करण्याचा अपराध करणारे हेच लोक आहेत आणि त्यातल्याच संघवीरांनी काशी नगरीत अधम कृत्य केले आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

हेही वाचा – BHU Rape Case : भाजपाचे खरे चालचरित्र हेच आहे, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

भाजपाच्या ढोंगबाजीवर कुणीतरी संशोधन करून ‘पीएचडी’ मिळवायला हवी. वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये एका मुलीवर सामुदायिक बलात्काराचे कांड घडले. हे बलात्कार कांड दोन महिन्यांपूर्वी घडले, पण संबंधित गुन्हेगारांना आता म्हणजे दोन महिन्यांनी अटक झाली. अटक झाली तरी त्या नराधमांना कठोर शिक्षा होण्याची ‘गॅरंटी’ नाही. कारण बलात्कार कांडातील तीनही आरोपी भाजपाच्या ‘आयटी सेल’चे मुख्य पदाधिकारी असून त्यांचे संघ शाखेवर नियमित जाणे-येणे आहे, असे सामना दैनिकातील अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

कुणाल पांडे, सक्षम पटेल, अभिषेक चौहान हे संघवीर वाराणसी भाजपाच्या ‘आयटी सेल’चे संयोजक आहेत. ही एक प्रकारची भाजपाची ‘गोबेल्स सेना’ आहे. प्रत्येकी दोन-दोन रुपये दराने एखाद्याच्या विरोधात बदनामीचे संदेश पाठवण्याचे काम ही गोबेल्स सेना करते आणि त्याच चिखलातून उपजलेल्या या तिघांनी वाराणसीत बलात्कार कांड केले, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Transport strike : असे राक्षसी कायदे करण्यात आले तर…, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

हे बलात्कारी ‘संघ’ परिवाराशी नात्यात असल्याने दोन महिने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दबाव आणून, आमिषे दाखवून प्रकरण रफादफा करण्याची योजना तथाकथित हिंदू संस्कृती रक्षक आणि दक्षक अमलात आणू शकले नाहीत. चार राज्यांतील निवडणुकांवर या बलात्कार कांडाचा परिणाम होईल असे वाटल्याने दोन महिने चालढकल केली आणि आता गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

या संघ स्वयंसेवकांनी हिंदू विद्यापीठात, काशी नगरीत, मोदी यांच्या प्रिय वाराणसी नगरीत एका अबलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढले आणि संपूर्ण भाजपाची त्यामुळे वाचाच गेली. हे प्रकरण एखाद्या गैरभाजपाशासित राज्यात घडले असते तर, भाजपच्या बजरंगी फौजांनी तेथे कूच केले असते आणि पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील तेथे पोहोचले असते. पण आता सगळाच सन्नाटा आहे. हा सन्नाटा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: कोण आहेत शिल्पकार अरुण योगीराज? ज्यांनी साकारली रामलल्लाची लोभस मूर्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -