घरदेश-विदेशIsrael-Hamas War : इस्रायलला पाठिंबा पण..., पॅलेस्टाइनबाबतही भारताने स्पष्ट केली भूमिका

Israel-Hamas War : इस्रायलला पाठिंबा पण…, पॅलेस्टाइनबाबतही भारताने स्पष्ट केली भूमिका

Subscribe

भारताने इस्रायल आणि हमासच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिलेला असला तरी पॅलेस्टाईनबाबतची भूमिका देखील स्पष्ट करण्यात आलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंग बागची यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 2 हजार 600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इस्रायल हमासविरोधात तीव्र लढा देत असून अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या कठीण काळात भारतातील लोक त्यांच्या देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून सांगण्यात आले होते. भारताने या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिलेला असला तरी पॅलेस्टाईनबाबतची भूमिका देखील स्पष्ट करण्यात आलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंग बागची यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. (Israel-Hamas War: Support to Israel but…, India also clarified its stance on Palestine)

हेही वाचा – Bilkis Bano Case: सर्वोच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रे सादर करण्याचे गुजरात सरकारला दिले निर्देश

- Advertisement -

अरविंद बागची यांनी म्हटले आहे की, पॅलेस्टाईन समस्येवर द्विराष्ट्रीय तोडगा काढण्याच्या बाजूने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करण्याबाबत त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे. यासंदर्भात भारताचे धोरण दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण आहे. भारताने नेहमीच इस्रायलशी सुरक्षित संबंध ठेवले आहेत आणि मान्यताप्राप्त सीमांमध्ये सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य पॅलेस्टाईनच्या स्थापनेसाठी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. यासोबतच त्यांनी इस्रायलशी शांततापूर्ण संबंधांचा पुरस्कार केला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करणे ही एक सार्वत्रिक जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे दहशतवादाच्या धोक्याशी लढणे ही देखील जागतिक जबाबदारी आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 2,600 लोकांना प्राण गमवावे लागले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमासच्या युद्धात आत्तापर्यंत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमवला आहे. या युद्धात अनेक भारतीय इस्रायलमध्ये अडकले आहेत. यांतील 212 भारतीयांना भारतात सुखरूप परत आणण्यात आले असून अद्यापही 18 हजार भारतीय तिथेच अडकले आहेत. या युद्धात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे. तर, सध्याची इस्रायलमधील परिस्थिती पाहता तेथील भारतीयांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आला आहे. याबाबतची पोस्ट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर केली आहे.

- Advertisement -

आपत्कालीन क्रमांक 1800118797, +91-11 23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आणि +919968291988 आहेत. तसेच ईमेल : [email protected] असा आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक +972-35226748 आणि +972- 543278392 आहेत. या क्रमांकावर भारतीय नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -