घरदेश-विदेशपैज पडली महागात; ४२ अंडी खाल्ल्याने झाला मृत्यू

पैज पडली महागात; ४२ अंडी खाल्ल्याने झाला मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने मस्करीत ५० अंडी खाण्याची पैज लावली होती. मात्र या पैजेमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीचा पैजेमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने मस्करीत ५० अंडी खाण्याची पैज लावली होती. या अंड्यांसोबत एक दारुची बॉटल देखील पिण्याची पैज लावण्यात आली होती. मात्र हीच पैज तरुणाच्या अंगलटी आली आहे. ५० अंड्यांची पैज जिंकण्यासाठी त्या तरुणाने एका मागोमाग अंडी खाण्यास सुरुवात केली. मात्र, ४२ अंडी खाल्यानंतर तो बेशूद्ध झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. या तरुणाचे नाव सुभाष यादव असे होते. ही घटना जौनपूर येथील बीबीगंज बाजार येथील आहे. या घटनेबाबत ‘न्यूज18’ ने माहिती दिली.

काय आहे नेमके प्रकरण?

सुभाष यादव (४२) हे शाहगंज कोतवाली येथील अर्गुपुर कलां धौरहरा गावाचे रहिवासी होते. त्यांचा ट्रॅक्टर आणि बुलेरो गाडी चालवण्याचा व्यवसाय होता. शुक्रावारी ते बीबीगंज बाजारात अंड खाण्यासाठी गेले. त्यावेळी इतर व्यक्तींसोबत चर्चा करत असताना मस्करीत समोरच्या व्यक्तीने २ हजार रुपयांची ५० अंडी खाण्याची  पैज लावली. ती पैज त्यांनी मान्य केली. मात्र, ४२ वे अंड खाल्यानंतर सुभाष यादव जमिनीवर कोसळले. ते बेशुद्ध झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले. सुभाष यांच्या पश्च्यात त्यांची गर्भवती पत्नी आणि आई आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुजिथचं बचावकार्य पाहत असता, स्वत:चीच मुलगी टबमध्ये बुडाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -