नवी दिल्ली : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एएससी दक्षिण सेंट्र 2ATCसाठी भरती होणार आहे. या अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधीच आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना थेट केंद्रीय शासनाची नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 2 फेब्रुवारीपर्यंय अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यानंतर आलेले उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 27 अशी वयाची अट आहे. त्यामुळे केंद्र सरकारमध्ये काम करू इच्छुक असणाऱ्यासाठी मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून कोणत्याही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. या भरती प्रक्रियेतसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
हेही वाचा – Arvind Kejriwal ED Summon: ईडीच्या समन्सवर केजरीवाल थेटच बोलले; निवडणुकीपूर्वी मला…
नोकर भरतीसाठी उमेदवारांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे
- उमेदवारांनी अर्जासोबत सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा
- अर्ज भरण्याची शेवटी तारीख ही 2 फेब्रुवारी 2024 आहे.
- पत्ता – पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र दक्षिण 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.