देशात कोरोना परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘देशात आता कोरोना व्हायरसची स्थितीत नियंत्रणात येते आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दर घटत असून सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे देशासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.’ यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत वीके पॉल यांनी एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस दिले जाऊ शकतात का? यावर उत्तर दिले.
Pandemic is stabilising in a major part of the country. Positivity rate is going down & active cases are going down: Dr. VK Paul, Member-Health, Niti Aayog#COVID19 pic.twitter.com/l1SeVmNuB7
— ANI (@ANI) May 22, 2021
याबाबत वीके पॉल म्हणाले की, एका व्यक्तीने पहिल्या डोस एक लसीचा आणि दुसऱ्या डोस दुसऱ्या लसीचा घेणे हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि सिद्धांतानुसार शक्य आहे. परंतु अशी स्थिती विकसित होत असल्यामुळे याची शिफारस करणे योग्य नाही. सध्या याबद्दल कोणताही ठाम पुरावा नाही आहे आणि येत्या काळात काय ते समजेल.
You asked me if a person can get inoculated with a vaccine different from the one he received in the first dose. Scientifically & theoretically it's possible. But recommending this – is evolving situation. No robust scientific evidence, only time will tell: Dr VK Paul, Niti Aayog pic.twitter.com/YLjfOO0f7o
— ANI (@ANI) May 22, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘१० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ७ राज्यांमध्ये होत आहे. तर ६ राज्यांमध्ये ५ ते १० हजार दरम्यान रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ६ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.’ देशात आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लसीकरण पार पडले आहे.
हेही वाचा – देशात कोरोनाचे लाखो मृत्यू अॅलोपॅथीने, बाबा रामदेव यांचा आरोप, IMA चा निषेध