काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘चौकीदार ही चोर’ सध्या एक नवी गुन्हे मालिका सुरू आहे. त्यामध्ये सीबीआय, एनएसए यांच्या प्रमुख भूमिका असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून चढवला आहे. तसेच या मालिकेमध्ये अधिकारी थकले आहेत. विश्वास तुटला आहे आणि लोकशाही रडत असल्याचं देखील राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दिल्ली में ‘चौकीदार ही चोर’ नामक एक क्राइम थ्रिलर चल रहा है|
नए एपिसोड में CBI के DIG द्वारा एक मंत्री, NSA, कानून सचिव और कैबिनेट सचिव के खिलाफ गंभीर आरोप हैं।
वहीं गुजरात से लाया उसका साथी करोड़ों वसूली उठा रहा है|
अफ़सर थक गए हैं| भरोसे टूट गए हैं| लोकतंत्र रो रहा है| https://t.co/Tng5uu6m5q
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2018
सीबीआयमध्ये संचालक आणि विशेष संचालकांमध्ये लाचखोरीवरून सुरू असलेला वाद उफाळून आला. त्यावेळी राकेश अस्थाना यांच्या चौकशीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आडकाठी केल्याचा आरोप आरोपांची चौकशी करणारे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. त्यामध्ये सिन्हा यांनी केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी यांच्यावर देखील लाचखोरीचा आरोप केला. याच मुद्याला पकडत राहुल गांधी यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार ही चोर’ क्राईम थ्रिलर सुरू आहे. अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे.