भारतात कोरोनाचा वाढता कहर अद्याप सुरूच असून दररोज कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहे. सोमवारी कोविड -१९ च्या रूग्णांची संख्या ६० लाखांच्या पुढे गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२ हजार १७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात व्हायरसमुळे १ हजार ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
India's #COVID19 tally crosses 60-lakh mark with a spike of 82,170 new cases & 1,039 deaths reported in the last 24 hours.
Case tally stands at 60,74,703 including 9,62,640 active cases, 5,01,6521 cured/discharged/migrated & 95,542 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pxCS5ar40u
— ANI (@ANI) September 28, 2020
या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या ६० लाख १६ हजार ५२१ पर्यंत पोहोचली आहे. तर ५० लाख १६ हजार ५१२ लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत आणि रुग्णालयात उपचारानंतर घरी परतले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे ९५ हजार ५४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात २७ सप्टेंबर पर्यंत ७ कोटी १९ लाख ६७ हजार २३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी रविवारी दिवसभरात ७ लाख ९ हजार ३९४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिली आहे.
7,19,67,230 samples tested up to 27th September for #COVID19. Of these, 7,09,394 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/gGNHNYxNLO
— ANI (@ANI) September 28, 2020