घरक्राइमशेतात गेलेल्या महिलेचा आधी कापला गळा, मृतदेहही जाळला; थरकाप उडणारी घटना वाचा...

शेतात गेलेल्या महिलेचा आधी कापला गळा, मृतदेहही जाळला; थरकाप उडणारी घटना वाचा सविस्तर

Subscribe

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पश्चिम बंगाल : देशात मागील काही दिवसांपासून क्रृरतेचा कळस गाठणाऱ्या घटना घडत आहे. आसाममध्ये सैन्य अधिकाऱ्याच्या पत्नीने घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती त्यानंतर उज्जैनमध्येही अल्पवयीन मुलीव लैंगिक अत्याचार करून तिला नग्नावस्थेत फिरवले होते. या दोन घटनेनंतर आता पश्चिम बंगालमध्ये शेतात गेलेल्या एका महिलेचा गळा कापून त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. तेव्हा देशात महिला सुरक्षित आहेत तरी कुठे असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. (The throat of the woman who went to the farm was first cut the body was also burnt Read the shocking incident in detail)

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सापडलेल्या महिलेचा गळा कापला असून, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पश्चिम बंगालमधील स्वरूपनगरमधील गोविंदपूर भागात हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

नराधमांनी महिलेची ओळख पटू नये म्हणून केले असे काही…

जेव्हा महिलेचा मृतदेह आढळून आला तेव्हा त्या मृतदेहाचा चेहरा कापडाने झाकलेला होता आणि तिचे हात गुडघ्यामागे काठीने बांधलेले होते. एवढेच नाही तर त्या जळालेल्या कपड्यांमधून धूरही निघत होता. गावकऱ्यांनी त्या महिलेला ओळखले आहे. ती महिला काही कामासाठी शेतात गेली होती. तेव्हा तिच्यासोबत हा प्रकार झाला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नराधमानी महिलेचा मृतदेह अशारितीने जाळला की, जणेकरून तिची ओळख पटू नये.

हेही वाचा : ‘जर पुन्हा असं घडलं तर गालावर…’ मराठी महिलेला घर नाकारल्याप्रकरणी राज यांचा ‘ठाकरे’ शैलीत समाचार

- Advertisement -

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत केले असून, ते आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : शर्मिला ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटेंची प्रतिक्रिया;  म्हणाल्या…

पश्चिम बंगालमधील राजकारण तापले

या प्रकरणावरून आता राजकारण तापले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, उत्तर 24-परगणा येथील भारत-बांगलादेश सीमेजवळील एका शेतात रक्ताने माखलेली महिला तिचा गळा कापलेल्या अवस्थेत आढळली आणि तिचा चेहरा जळालेला आहे, परंतु ममता बॅनर्जी यांनी एक शब्दही उच्चारला नाही. इतकंच नाही तर भाजप नेते संबित पात्रा म्हणाले की, बंगालच्या या महिलेसोबत जे घडले ते मन हेलावून टाकणारे आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार राज्यातील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे असाही आरोप त्यांनी लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -