घरमनोरंजनपहिल्या नवऱ्याला का सोडलं ? ट्रोलर्स च्या प्रश्नाला अभिज्ञाचं सणसणीत उत्तर

पहिल्या नवऱ्याला का सोडलं ? ट्रोलर्स च्या प्रश्नाला अभिज्ञाचं सणसणीत उत्तर

Subscribe

अभिज्ञा भावे ही सोशल मीडीयावर बरीच सक्रीय असते. हे फार कमी जणांना माहित आहे. तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत काही यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे यावर तिने त्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिले आहे.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिज्ञा  नव वर्षीच्या सुरुवातीला मेहुल पैशी याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. मुंबईमध्ये ६ जानेवारी २०२१ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. अनेक मराठी कलाकारांनी अभिज्ञाच्या लग्नासोहळ्याला हजेरी लावली. लग्नानंतर हे जोडपे आनंदाने संसार करत असताना काही सोशल मीडिया युजर्सनी अभिज्ञाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अभिज्ञाचे हे दुसरे लग्न आहे. यावरुन ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ट्रोलर्सला सडेतोड असे उत्तर दिले आहे. या उत्तराचा स्क्रिनशॉटही तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

- Advertisement -

एका यूजरने दुसऱ्या नवऱ्याचं काय एवढं, पहिला नवरा का सोडला? असा प्रश्न अभिज्ञाला विचारला होता. त्यावर तिने त्या ट्रोलरला ‘माझी सीरियल टीव्ही वर बघता. आयुष्य नाही. देव तुमच्यावर अशी वेळ आणू नये ही प्रार्थना’ असे सणसणीत उत्तर दिले. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने ‘दुर्दैवाने माझेच मराठी बांधव’ असे म्हटले होते.

- Advertisement -

अभिज्ञाने २०१४ मध्ये वरुण वैटिकरसोबत लग्न केले होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आणि दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा ही एअरहॉस्टेस होती. २०१० मध्ये ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याचबरोबर अभिज्ञाची ‘मुव्हिंग आऊट’ ही वेबसीरिज आली होती प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.


हे वाचा- प्रभास आणि श्रुती हसन या चित्रपटात दिसणार एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -