बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री सर्वांना माहिती आहे. वेलकम, नमस्ते लंडन, सिंग इज किंग यारख्या दमदार सिनेमात दोघांनी काम केले आहे. सिनेमाच्या स्क्रिनवर दमदार केमिस्ट्री असलेल्या खिलाडी अक्षय कुमारला कतरिनाला राखी बांधायची होती. हे ऐकून दोघांच्याही फॅन्सला धक्का बसेल. २०१६मध्ये एका मुलाखतीत कॅटरीनाने हा खुलासा केला होता. ‘तीस मार खान’ या सिनेमातील ‘शीला की जवानी’ या धम्माल गाण्याच्या वेळेस कतरिनाने अक्षय कुमारला राखी बांधून त्याला भाऊ मानण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्या नंतर खिलाडी अक्षयच्या उत्तराने कतरिनाची बोलतीच बंद झाली. काय आहे तो किस्सा जाणून घ्या. (Bollywood Actress Katrina kaif wanted to tie Rakhi Akshay Kumar)
मुलाखतीत कतरिना म्हणाली, तीस मार खान सिनेमाच्या शुटींग दरम्यान माझा भाऊ बनण्यासाठी कोणीही का तयार नव्हते हे मला माहिती नाही. माझ्यासाठी कोणीही नव्हते. मी एकटी होते. त्यामुळे मी शीला की जवानी या गाण्याच्या शुटींगच्या वेळी अक्षयला मी तुला राखी बांधू का? असे विचारे त्यावर अक्षयने तुला एक थप्पड खायची आहे का? असे म्हटले. त्यावर माझी बोलती बंद झाली आणि मी त्याच्यापुढे काहीच बोलू शकले नाही.
कतरिना पुढे म्हणाली, रात्री मी माझ्या मित्रांच्या घरी जाऊन रहायची तेव्हा मी फार दु:खी असायचे. त्यावेळी माझ्या समोर अर्जुन कपूर आला. त्यावेळी तो खूप स्वीट आणि हेल्दी होता. तो माझ्या समोर उभा होता तेव्हा मी त्याला तु माझा भाऊ होशील का? असे विचारले. अर्जुनला राखी बांधून घ्यायची नव्हती म्हणून तो पळून गेला. मी त्याला पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र मला त्याला राखी बांधणे काही जमले नाही.
हेही वाचा – दीपिकाचा इन्स्टाग्रामवर कम बॅक, पोस्टवर कमेंट्सचा पाऊस