घरमनोरंजनविकास गुप्ता 'या' कारणामुळं 'खतरो के खिलाडी'मधून बाहेर

विकास गुप्ता ‘या’ कारणामुळं ‘खतरो के खिलाडी’मधून बाहेर

Subscribe

'खतरो के खिलाडी ९' या रियालिटी शोमध्ये विकास गुप्ताला अजगरानं चावा घेतल्यामुळं शो मधून एक्झिट घ्यावी लागली आहे.

‘बिग बॉस ११’ चा सिझन विकास गुप्तामुळं एका वेगळ्या लोकप्रियतेवर पोहचला होता. या शोनंतर विकास गुप्ताला रियालिटी शोचं किंगदेखील म्हटलं जातं. काय केल्यानंतर शो सुपरहिट होतो याची विकास गुप्ताला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळंच प्रसिद्ध ‘खतरो के खिलाडी ९’ या रियालिटी शोमध्येदेखील विकास गुप्ता स्पर्धक म्हणून आला. मात्र विकासच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी आहे. विकासला या शो मधून बाहेर पडावं लागत आहे. या शोमध्ये एका स्टंटदरम्यान विकासला अजगरानं चावल्यामुळं आता त्याला या शो मधून बाहेर पडावं लागत आहे.

नक्की काय झालं?

शो च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासला ‘खतरो के खिलाडी ९’ च्या फिनालेच्या केवल २ आठवडे आधी निर्मात्यांद्वारे शो सोडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या शो मध्ये येण्याआधीदेखील विकासच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र ही गोष्ट विकासनं निर्मात्यांपासून लपवून ठेवली आणि स्टंटदरम्यान पेनकिलर इंजेक्शन घेऊनच त्याला हे स्ंटट करता येऊ शकत होते, ज्यामुळं त्याच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकत होतं. विकासला अजगर चावल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. त्यानंतर विकासला डॉक्टरजवळ नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला एक आठवड्यापर्यंत आराम करण्यासाठी सांगितलं. मात्र विकासची एकंदरीतच आता प्रकृती पाहता त्याला या शो चा भाग होऊ देणं डॉक्टरांना मान्य नाही.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

‘खतरो के खिलाडी ९’ च्या सेटवर स्टंट करत असताना कॉमेडियन लाफ्टर क्वीन भारती सिंहवर अजगराने हल्ला केला. त्यावेळी भारतीबरोबर अन्य स्पर्धकदेखील होते. मात्र विकास गुप्तानं यावेळी भारतीला वाचवायचा प्रयत्न केला. पण भारतीला वाचवताना अजगरानं विकासचा चावा घेतला. दरम्यान लवकरच हा शो प्रदर्शित होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -