घरलाईफस्टाईलफळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे टाळा

फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे टाळा

Subscribe

फळांचे जास्त प्रमाणात देखील सेवन करू नये.

आपण नेहमी फळं किंवा सॅलडचे सेवन करत असतो. ही एक चांगली सवय आहे. मात्र अनेकदा लोकांना या गोष्टी सेवन करून झाल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. कच्चे फळं आणि सॅलडचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याची सवयीमुळे ही समस्या उद्भवते. कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही हे आयुर्वेदानुसार म्हटलं गेलं आहे.

फळांमध्ये जास्त प्रमाणात शुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळाचे सेवन केल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे पाणी आणि अॅसीडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत करते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊन पोट फुगते.

- Advertisement -

फळं जास्त प्रमाणात खाऊ नका. सॅलड आणि फळांचे अयोग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटाचा त्रास होतो. फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असतं त्यामुळे फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याने अतिसाराचा धोका वाढतो.

फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यपेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचं निर्माण करू लागतात ज्यामुळे पोट जड वाटू लागतं. म्हणून ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. या कारणासाठी फळं योग्य प्रमाणात आणि चावून चावून खावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -