आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब हे अत्यंत महत्त्वाचा मानल जात. कडुलिंबाची चव कडू असली तरी कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील निम्मे आजार बरे होतात. रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊया…
रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे
1. रक्तातील साखरेचे नियंत्रण
खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच लोक अजूनही घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
2. रक्त शुद्ध राहण्यासाठी
कडुलिंबात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करते. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते. तुमच रक्त शुद्ध राहिल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.
3. पोटासाठी फायदेशीर
कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत. आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अॅसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
4. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. एवढेच नाही तर सर्दी आणि फ्लू सारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.
कडुलिंबाची पाने ‘अशा’ प्रकारे वापरा
साधारणपणे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस सेवन केला जातो. ताज्या कडुलिंबाच्या पानांचा रस नेहमी सेवन करा. हवं असल्यास कडुनिंबाची कडुनिंबाची पानं तव्यावर कोरडी भाजून, हाताने मॅश करून, त्यात लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता.
कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना अशी खबरदारी घ्या
एका वेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका.
कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल असे अनेकांना वाटते.
मात्र, याचे नेहमी कमी प्रमाणात सेवन करा.
जर तुम्हाला आजार असेल तर सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.