घरमहाराष्ट्रराज्यात १५ जण करोनासाठी निरीक्षणाखाली, २३० प्रवासी करोना निगेटिव्ह!

राज्यात १५ जण करोनासाठी निरीक्षणाखाली, २३० प्रवासी करोना निगेटिव्ह!

Subscribe

करोनासाठी केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार देखील पुरेशी काळजी घेत असून करोनाबाधित देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी सुरू आहे. त्यापैकी एकूण २३० जणांना ट्रीटमेंटनंतर घरी सोडून देण्यात आले असून १५ जणांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत.

राज्यात सध्या १५ जण संशयित करोनासाठी निरीक्षणाखाली असून एकूण २२९ प्रवासी करोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. सध्या राज्यात निरीक्षणाखाली १५ जण आहेत. २३० जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९३ विमानांमधील ९६ हजार ४९३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे आणि नागपूर विमानतळावर देखील स्क्रीनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५३२ प्रवासी आले आहेत.

२३० जणांना उपचारांनंतर घरी सोडले

दिनांक १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत आजपर्यंत २४२ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी २२९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे संस्थेने दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल अजून बाकी आहेत. आजवर भरती झालेल्या २४५ प्रवाशांपैकी २३० जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण मुंबईत तर ३ पुणे येथे दाखल आहेत.


हेही वाचा – करोना रोखण्यासाठी पंतप्रधानांनी दिला ‘नमस्ते’चा मंत्र!

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार…

  • वुहान (चीन) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते
  • इतर बाधित देशांतील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते
  • बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे
  • या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.
    याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशांस सूचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -