घरमहाराष्ट्रसीरियल किलरसारखी भाजपाची मोडस ऑपरेंडी; राष्ट्रवादी फुटीनंतर संजय राऊतांचा मोठा आरोप

सीरियल किलरसारखी भाजपाची मोडस ऑपरेंडी; राष्ट्रवादी फुटीनंतर संजय राऊतांचा मोठा आरोप

Subscribe

ठाणे : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra politics) गेल्या दोन दिवसांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासह पक्षातील इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, शिवसेनेसोबत झाले तेच राष्ट्रवादीसोबत होत आहे. भाजपा सीरियल किलरसारखी मोडस ऑपरेंडी वापरत असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे. (BJPs modus operandi like a serial killer Sanjay Rauts big accusation after the Nationalist split)

हेही वाचा – #NCPBreaksUp : शरद पवारांचा मोठा निर्णय; दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी ‘या’ विश्वासू नेत्याकडे

- Advertisement -

शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला त्यांनी शिवसेना या पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा विचार फुटलेल्या लोकांच्या डोक्यात नव्हता. हे दिल्लीच्या भाजपावाल्यांचे डोकं आहे. कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. तीच पद्धत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीच्या बाबतीत अवलंबली आहे. राष्ट्रवादी फुटली आणि त्याच वेळेला त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून राष्ट्रवादी पक्ष, चिन्हांवर आणि आम्हीच खरे राष्ट्रवादी हा दावा करायला लावला. त्यांची गुन्हेगारांसारखी मोडस ऑपरेंडी आहे. एखादा सीरियल किलर असतो, सीरियल रेपिस्ट असतो, तसे भाजपा राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिवसेनेचे आमदार, मंत्री अस्वस्थ! मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली नाराजी

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव नष्ट करायच आहे

संजय राऊत म्हणाले की, पक्ष एका विशिष्ट आकड्यांमध्ये फोडायचा आणि फुटलेल्या गटाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावायचा हे यांचं धोरण आहे. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवारांचं नाव नष्ट करायचं. स्वतः काहीच करायचं नाही आणि जे स्वतः काही करत नाहीत ते अशा गोष्टी करतात. इतर राज्यांमध्ये भाजपाचे हेच प्रयत्न सुरु आहेत. कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – नितीन गडकरींची तब्येत पुन्हा बिघडली; ‘या’ त्रासामुळे पंतप्रधान मोदींची बैठक अर्धवट सोडली

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्याने भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं

संजय राऊत म्हणाले की, न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा विचार केला तर शिवसेनेने लढाई जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातल्या फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाणार आहे आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. तोच निकाल पुढे राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटालाही लागू पडू शकतो, याची मला 100 टक्के खात्री आहे. त्यामुळे विधीमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही, हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानेॉही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुणीही काहीही राजकारण केलं तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या जागेवर परत जातील. त्यामुळे सध्याच्या राजकारणाला ऑपरेशन लोटस वगैरे म्हणणं बरोबर नाही, मला तर वाटत आहे भाजपाचंच ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यामुळे भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -