घरताज्या घडामोडीShahu Maharaj : आता मैदानात उतरायची वेळ आली; उमेदवारीनंतर शाहू महाराजांचं स्पष्टीकरण

Shahu Maharaj : आता मैदानात उतरायची वेळ आली; उमेदवारीनंतर शाहू महाराजांचं स्पष्टीकरण

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी गुरूवारी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रात सात लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शाहू महाराजांनी एक वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी गुरूवारी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रात सात लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शाहू महाराजांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानुसार, वर्षभरापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ती वेळ आली असेल, असे वक्तव्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले. (chhatrapati shahu maharaj candidate of kolhapur lok sabha from mva congress)

छत्रपती शाहू महाराज यांना गुरुवारी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी “मी स्वत:ला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण वर्षभरापूर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा माझा निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला”, असे शाहू महाराज यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “आपल्या महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेण्याचं काम मी करणार आहे. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे”, असेही शाहू महाराज म्हणाले.

त्याचप्रमाणे “सध्याच्या काळात पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुरोगामी घटक एकट्याने लढले तर यशस्वी होणे कठीण आहे. त्यामुळे सर्व पुरोगामी पक्ष आणि घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे”, असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA 2024 : अभिनेता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात? मुख्यमंत्री शिंदे देणार उमेदवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -