घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी केवळ ३१ कोटी खर्च, ९९ कोटी अद्यापही...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी केवळ ३१ कोटी खर्च, ९९ कोटी अद्यापही शिल्लक

Subscribe

मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते. मात्र मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १३० कोटी पैकी फक्त ३१ कोटी खर्च करण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री सहायता निधीत ९९ कोटी रक्कम शिल्लक असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली सरकारी कामकाजाची माहिती घेत असतात. कोरोना काळातही त्यांनी लसीकरण आणि कोरोनावरील उपाययोजनांबाबतची माहिती राज्य सरकारकडून घेतली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून आतापर्यंत १३० कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना ९ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी ४९३२ नागरिकांना २२ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (मुख्य निधी) दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून ९९ कोटी रुपये शिल्लक आहे. दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी ८ नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मी….. बिपीन रावत यांचे शेवटचे शब्द, बचावकर्त्याने सांगितला घटनाक्रम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -