घरमहाराष्ट्रकाँग्रेस पाच वर्षे उद्धव ठाकरेंसोबत

काँग्रेस पाच वर्षे उद्धव ठाकरेंसोबत

Subscribe

मुख्यमंंत्र्यांच्या इशार्‍यानंतर पटोलेंची माघार

स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी काहीशी सबुरीची भूमिका घेतली. काँग्रेस पक्ष हा पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेल. तसा शब्द खुद्द सोनिया गांधी यांनी दिला आहे, असे पटोले यांनी सांगितले.

कोथरूड येथे नगरसेवक चंद्रकांत कदम यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नाना पटोलेंच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलले. स्वबळाची भाषा शिवसेना सुद्धा करते. त्यामुळे मुख्यमंत्री नेमके कोणाला उद्देशून बोलले हे कळले तर त्यावर बोलता येईल,असे सांगून नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले.

- Advertisement -

  नेमके काय झाले

स्वबळाची भाषा आणि मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवल्यापासून महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, शनिवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या संकटाच्या काळात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गंभीरपणे काम केले पाहिजे. अशा परिस्थितीत कुणी स्वबळावर निवडणुका लढू असे म्हणत असेल तर लोक जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसमध्येही स्वबळाच्या भूमिकेबाबत मतभेद असल्याचे पुढे आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -