घरमहाराष्ट्ररिक्षाचे स्टिअरिग मुख्यमंत्र्यांच्या हातात;पण कु ठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात

रिक्षाचे स्टिअरिग मुख्यमंत्र्यांच्या हातात;पण कु ठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात

Subscribe

ऑटो रिक्षाचे स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे; पण कुठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.

आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, हे धोक्याने आलेले सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचे काम आहे, असेही फडणवीस म्हणाले. कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत. मात्र, आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, मग महाराष्ट्र्र याबाबत 19 व्या क्रमांकावर का आहे? मुंबईत टेस्ट होत नाहीत. कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे. सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते, असा दावाही फडणवीसांनी केला.

हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी-चिंचवडला मदत देत नाही. तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहोत. मात्र, ही लपवालपवी थांबवा, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचा आक्रोश वाढत आहे. कुणाच्या काळात किती मृत्यू, यावर मी विश्वास ठेवत नाही. मात्र, शेतकर्‍यांना आपण मदत करत आहोत का? शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही, कापूस खरेदीही होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

दुधामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना रोज थोडे पैसे मिळतात. आम्ही वर्षभर अनुदान दिले, भुकटीसाठी अनुदान दिले, हजार कोटी अनुदान राज्याने आमच्या काळात दिले. 7 लाख लिटर दूध कुणाचे विकत घेतले, ते सांगा. कोण त्या डेअरीचे मालक आहेत त्याची माहिती द्या, बांधावर बियाणे देऊन खत देणार. मात्र सरकारी बियाणंच खोटे निघाले, असा घणाघातही देवेंद्र फडणवीसांनी केला. काही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही. हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आली, असेही फडणवीस म्हणाले.

विद्वान संपादक आणि विद्वान मुख्यमंत्री
काल-परवा जी मुलाखत झाली, त्यामध्ये विद्वान संपादक ते विद्वान आहेत, मी चुकीच्या अर्थाने बोलत नाही. त्यांचे आमचे विचार पटो अथवा नाही, पण मला माहिती आहे की ते विद्वान आहेत. विद्वान आहेत ते तीन की चारवेळी राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना सर्व कल्पना आहेत; पण ते प्रश्न विचारतात, का हो, साखरेचा प्रश्न घेऊन गृहमंत्र्यांकडे कशासाठी गेले? त्याला आमचे मुख्यमंत्री उत्तर देतात, साखर तर घरातच असते, गृहमंत्री म्हणजे आमचे घराचे मंत्री म्हणजेच आदेश भावोजी. काय चाललंय? अरे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती असू नये, की या राज्यातला जो सर्वात मोठा साखर उद्योग आहे, या उद्योगाच्या पुनरुजीवनासाठी मंत्रिगट तयार झाला आहे. त्या मंत्रिगटाचे प्रमुख अमित शाह आहेत. म्हणून त्यांना भेटल्याशिवाय साखर उद्योगाला मदत मिळू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. आमच्यानंतर शरद पवारसाहेब यांनी देखील जे पत्र दिले आहे ते पंतप्रधानांना लिहिलेले नाही, ते कृषीमंत्र्यांना लिहिलेले नाही किंवा ते आदेश भावोजींनाही लिहिलेले नाही, त्यांनी ते पत्र भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -