घरताज्या घडामोडीराज्यभरात 'मुसळधार', मुंबईत यलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यभरात ‘मुसळधार’, मुंबईत यलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

मुंबईसह राज्यभराता परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) मुंबईत हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यभराता परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) मुंबईत हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rainfall Alert In Mumbai and Maharashtra)

शुक्रवारी सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असून, आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. शिवाय, 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यभरात परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

राज्यभरात पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये बसला भीषण अपघातः १४ प्रवाशी जळून खाक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -