घरमहाराष्ट्रनाशिकजमिनीच्या वादातून शेकडोचा जमाव आमने-सामने

जमिनीच्या वादातून शेकडोचा जमाव आमने-सामने

Subscribe

नाशिक शहरातील वडाळा गावात काहीकाळ दंगल सदृश्य परिस्थिती

नाशिक : जमिनीच्या वादातून सोमवारी दोन गटांत हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही गटांचे मिळून १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळागावातील साठेनगर येथील ब्ल्यू मून सोसायटीत राहणाऱ्या रौफ शेख यांचा अण्णा भाऊ साठेनगर येथील जागेवर इरफान शेख याने कब्जा केल्याने या दोघांमध्ये वाद झाला. त्यात इरफान आणि इतरांनी शेख यांच्यासह त्यांचा मुलगा सलमान आणि इमरान यांना मारहाण केली. तसेच दीडशे जणांच्या जमावासह शेख यांच्या ब्ल्यू मून येथील घरावर दगडफेक करून घराचे तसेच चारचाकी वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी इरफान शेख, आयुब शेख, बशीर शेख, वसीम, पम्मा, सोनू हबीब, शोएब, कदिर, कालू लाल हाजी, चिया आणि इतर पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, जागेचा वाद मिटवण्यासाठी गेलो असता रौफ शेख आदींनी आसिफ शेख आणि नातलगांना मारहाण केल्याची फिर्याद इरफान शेख यांनी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी रौफ शेख, युसुफ खान रईस शेख, इमरान शेख आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १६ जणांना अटक केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -