घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍यांना कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

शेतकर्‍यांना कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

Subscribe

खरीप हंगामासाठी ४४५ कोटांचे वाटप

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत केवळ ४४५ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले असून उद्दिष्टांपैकी निम्मेही कर्ज वितरण झाले नसल्याने कर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याचे यावरून दिसून येते. जे शेतकरी कर्जाचे हप्ते व कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील, अशा शेतकर्‍यांना बँकांनी खरीप हंगामासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण आणि सहकारी क्षेत्रातील बँका मिळून २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. तसेच शेतकर्‍यांनी सहकारी संस्थामार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमिनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकर्‍यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकर्‍यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत. शेतकर्‍यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 2021-22 या वर्षात 2700 कोटी कर्ज वाटपाच्या उद्दीष्टापैकी दोन महिन्यात 445 कोटींचे कर्ज वाटप झाले असून मागील वर्षीप्रमाणे यंदाही अधिक कर्ज वितरण करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर यांच्यासह सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -