घरताज्या घडामोडीधक्कादायक ! गळफास घ्यायचा म्हणत नवविवाहित जोडप्याने केली आत्महत्या;ओढणी तुटल्याने पत्नी बचावली

धक्कादायक ! गळफास घ्यायचा म्हणत नवविवाहित जोडप्याने केली आत्महत्या;ओढणी तुटल्याने पत्नी बचावली

Subscribe

दोनच महिन्यांपूर्वी सप्तशृंगी गडावर लग्न केलेल्या नवविवाहित जोडप्याने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यात पतीचा मृत्यू झाला तर ओढणी तुटल्याने पत्नी बचावली. ही घटना सोमवारी (दि.९) रात्री ८ वाजेदरम्यान आडगाव नाका, वालझाडे मंगळ कार्यालयाजवळील शेडमध्ये घडली. याप्रकरणी पत्नी काजल जिग्नेश धुमड (१८) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पती जिग्नेश जेसु धुमड (२२, मूळ रा. कुकुडणे, ता.सुरगाणा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी कालज व जिग्नेश यांनी सुखी संसाराचे स्वप्न पाहून सप्तशृंगी गड परिसरात लग्न केले होते. दोघांच्याही आई-वडिलांना लग्नाबाबत काहीच माहिती नव्हती. दोघे १० दिवसांपासून आडगाव नाका येथील वालझाडे मंगळ कार्यालयाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास होते. जिग्नेशने मोलमजुरी करुन संसारास सुरुवात केली. मात्र, सोमवारी तो रात्री घरी आला. आपल्याला गळफास घ्यायचा आहे, असे जिग्नेशने काजलला सांगितले. त्यास काजलनेसुद्धा प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांनी पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेण्याचे ठरवले. जिग्नेश व काजलने वेगवेगळ्या ओढणीने गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, काजलची ओढणीच तुटल्याने ती कॉटवर पडली. त्यामुळे तिचा जीव वाचला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. वाघ करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -