घरताज्या घडामोडीजिल्हयातील दहा हजार शेतकर्‍यांना ३३२ कोटी रुपयांचे पीककर्ज

जिल्हयातील दहा हजार शेतकर्‍यांना ३३२ कोटी रुपयांचे पीककर्ज

Subscribe

शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळावे याकरीता दर आठवडयाला सर्व बँक अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येउन आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत दहा हजार शेतकर्‍यांना ३३२ कोटी पर्यंतचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रियेतील दोष दूर करून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज वाटपासंदर्भात साप्ताहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यस्थापक अर्धंदू शेखर, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेही बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, वितरण प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्जवाटप करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करण्यात येत आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेव्यतिरक्त ज्या शेतकर्‍यांकडे कर्जाची थोडीफार थकबाकी असेल तर त्यांनी तातडीने ती जमा केली, तर ते शेतकरी नवे कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी बँकेचे तातडीने संपर्क करून पूर्तता करावी असे आवाहनही मांढरे यांनी केले. पीक कर्ज वाटप करताना बँकांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील बैठकीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पीक कर्ज लवकर मिळावे याबाबत नियोजन करण्यात येत आहे. बँकांना येणार्‍या अडचणींचे देखील तत्काळ निरसन केले जात आहे. तसेच प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकार्‍यांना क्षेत्रीय स्तरावर कर्जवाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देवून त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

डिजीटल पध्दतीचा वापर करावा
करोनाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटप करतांना बँकांनी अधिकाधिक डिजिटल पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून शेतकर्‍यांचा त्रास कमी होईल व त्यांना वेळेत पीककर्ज मिळेल. तसेच शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील बोजा नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात येतील. कर्जवाटप करणार्‍या बँकांनी बल्क एसएमसद्वारे शेतकर्‍यांना पीक कर्जाविषयीची माहिती पोहचवून ती माहिती शेतकर्‍यांना मिळाल्याची खात्री देखील करावी, असेही यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -