घरमहाराष्ट्रSupriya Sule : अदृश्य शक्तीची महाराष्ट्रातील राजकारणाला दृष्ट लागली; का म्हणाल्या सुप्रिया...

Supriya Sule : अदृश्य शक्तीची महाराष्ट्रातील राजकारणाला दृष्ट लागली; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं?

Subscribe

पुणे : बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबियांचे होम ग्राउंड तर आहेच पण आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने येथील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील लढत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार यांच्यात होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बारामतीचा गड कोणत्याही परिस्थितीत राखायचाच, या इर्षेने दोन्ही पक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये राजकारण करायला सुरुवात केली आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही इंदापूरमध्ये सुरु असलेल्या राजकीय दादागिरीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून धमकावण्याचा प्रकार घडला होता. याच मुद्द्यावरुन सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा – Loksabha : रावसाहेब दावनवेंचा ‘चिठ्ठी बॉम्ब’; म्हणतात, भाजपाच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात

- Advertisement -

हे दडपशाहीचे राजकारण

इंदापूर येथील सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना रोखठोक भाषेत इशारा दिला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली आहे. सध्याचे राजकारण हे लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या राजकारणात आयुष्य घालवलेल्या माणसाला धमकी मिळणे, हे दुर्दैवी आहे. असे राजकारण कधीच झाले नाही. गृहमंत्री असतानाही भीती राहिली नाही. बारामती मतदारसंघात कुणालाही धमकी दिली तर तो प्रकार सहन केला जाणार नाही. अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली. आम्ही सर्व एकत्र असताना कुणीही कुणाला धमकी दिली नाही. बारामती मतदारसंघात असा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकते आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांची जबाबदारी माझी आहे. माझ्या मतदारसंघात कुणालाही धमक्या दिल्या जात असतील तर सुप्रिया सुळे ताकदीने उतरेल, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून धमकावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहिले होते. ते चांगलेच व्हायरल झाले आणि त्याची चर्चाही रंगली होती.

हेही वाचा – Farmers Protest : ‘हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन होतं?’; उच्च न्यायालयाची शेतकऱ्यांवर नाराजी

- Advertisement -

लग्न समारंभात सुप्रिया सुळे-हर्षवर्धन पाटलांची भेट

काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका लग्नसमारंभात हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती. यावेळी या दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या. हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीमुळे बारामती मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -