घरमहाराष्ट्रडान्सबार सुरु; छोटा पेंग्विन खूश - निलेश राणे

डान्सबार सुरु; छोटा पेंग्विन खूश – निलेश राणे

Subscribe

राज्यभरातील डान्सबार सुरु केल्याने छोटा पेंग्विन खूश असेल असे ट्विट करुन निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

राज्यभरातील डान्सबार सुरु करुन सुप्रीम कोर्टाने डान्स बार मालकांना मोठा दिलासा दिला असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले’ त्यामुळे छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला होता. ‘उठसूठ कुणीही कुत्रं म्हणतं मी अयोध्येला जाणार’ अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मुंबईमध्ये आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल होतं. त्यानंतर त्यांनी दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त विधान देखील केले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना देखील लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

निलेश राणेंनी हे केले ट्विट

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. सुप्रीम कोर्टाने डान्सबारसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा दाखला त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, ‘छोटा पेंग्विन खुश असेल, त्याच्या मुंबई नाईट लाइफची मागणी त्यांनी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले’.

- Advertisement -

या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात

निलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये बेस्ट संपावरुन शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली आहे. ‘स्क्रिप्ट लिहायचं काम संजय राऊत यांचे आहे’. मात्र ‘स्वत:कडून प्रश्न सुटत नाही आणि दुसऱ्याने सोडवले की सहन होत नाही’. या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्याने लिहिले होते, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ही होती आदित्य ठाकरेंची मागणी

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ‘मुंबई रात्रभर जागी असते. उद्योग आणि सेवाक्षेत्र झपाट्याने विकसित होते आहे. तसेच शहराचे राहणीमान बदलत चालले आहे. त्यामुळे कॅफे, दूध केंद्र, औषधांची दुकाने, मॉल आणि हॉटेल्स हे रात्रभर सुरु ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. रात्रभर मुंबईसाठी अनिवासी भागाचा विचार व्हावा, असे त्यांचे म्हणणे होते.


वाचा – रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांना निलेश राणेंची समज

वाचा – कुणीही कुत्र उठतं, अयोध्येला निघतं – निलेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -