घरमहाराष्ट्रराज्यातील काही नेते अस्वस्थ मुख्यमंत्र्यांनी फिरायला हवे

राज्यातील काही नेते अस्वस्थ मुख्यमंत्र्यांनी फिरायला हवे

Subscribe

महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात फिरायला हवे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत.

महाविकास आघाडीचा रिमोट माझ्या हाती नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे जावे यावर सर्वांचे एकमत झाले, अशी माहितीही पवार यांनी दिली.

- Advertisement -

धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसेच निर्णय घेताना ते सर्व सहकार्‍यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे पवार म्हणाले. काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे केवळ मातोश्रीवर बसूनच काम करत आहेत. तसेच राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीवरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती.

सध्या कोणताही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे चालेल. देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचेच अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक कोणालाही नको असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज असल्याचंही शरद पवार म्हणाले.

निमंत्रण मिळाले तरी भूमिपूजनाला जाणार नाही 
सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -