घरमहाराष्ट्रकोल्हापूरात राजकीय वादातून हाणामारी; ८ जण गंभीर जखमी

कोल्हापूरात राजकीय वादातून हाणामारी; ८ जण गंभीर जखमी

Subscribe

राजकीय वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या हाणामारीत ८ जण गंभीर जखमी झाले असून सीताराम लाड यांचा हात तुटला आहे.

कोल्हापूरमध्ये राजकीय वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे गावामध्ये ही घटना घडली आहे. या हाणामारीत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सीताराम लाड आणि बारकू पाटील यांच्या गटामध्ये ही हाणामारी झाली आहे. तलवार, कोयता आणि काठ्याने एकमेकांवर वार करण्यात आले. राजकीय वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या हाणामारीत ८ जण गंभीर जखमी झाले असून सीताराम लाड यांचा हात तुटला आहे. जखमी झालेल्या सर्वांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर गेळवडे गावामध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -