घरमहाराष्ट्रराज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले...

राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले…

Subscribe

मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च राज्य सरकारने केला आहे. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का ? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम केवळ प्रसिद्धीसाठी राबविल्या असल्याचा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

शासनी आपल्या दारी कार्यक्रमावर वडेट्टीवार म्हणाले, सरकारने मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे राहवे लागत असून त्यांना सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तर, सत्ताधारी मंत्रालयाच्या दारावर

राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला असून त्यामुळे जनतेला शासनाच्या दारी म्हणजे मंत्रालयात जावे लागते. पण मंत्रालयात सरकारच्या जाचक अटीमुळे जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. यामुळे मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा पुरावा आहे, असे म्हणत विज वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -