घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून अंबादास दानवे यांनी सरकारचे काढले वाभाडे

Winter Session : राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून अंबादास दानवे यांनी सरकारचे काढले वाभाडे

Subscribe

नागपूर : राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 व अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना सरकारचे वाभाडे काढले. तसेच नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी ठरले, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. (Winter Session Ambadas Danve criticized the government over the deteriorating law and order situation in the state)

अंबादास दानवे म्हणाले की, सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही पॅकेज दिलं नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले असून राज्याला विकासापासून दूर नेण्याचं प्रयत्न करत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी, मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ ठरले असून कायदा व्यवस्थेचे भक्षक असल्याची टीकेची झोड उठवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : राज्यातील आरोग्यव्यवस्था मरणपंथाला; अंबादास दानवे यांची टीका

नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी

राज्यात संघटित गुन्हेगारीत झालेली वाढ, दिवसाढवळ्या होत असलेले खून, महिला अत्याचार, राज्यात मोठया प्रमाणात झालेल्या दंगलीच्या घटना या सर्व राज्याला भूषणावह नाही. नागपुरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळते आहे. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

- Advertisement -

विदर्भाच्या प्रश्नांवर कालबद्ध कार्यक्रम नाही

मागील 5 वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. गेले 5 वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? असा प्रश्न उपस्थित करत विदर्भात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. सरकार हे टक्केवारी व भ्रष्टाचाराचे काम करत असून जनतेच्या हिताचे कोणतेही काम करत नसल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

हेही वाचा – Danve vs Sattar : कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज…; अंबादास दानवेंचे सत्तारांवर गंभीर आरोप

मुंबईप्रमाणे पुणे महानगरपालिकेची चौकशी करावी

मुंबई महानगर पालिकेत मोठया प्रमाणात सुरू असलेली लूट, रखडलेल्या पालिका निवडणुका, सिडकोने 67 हजार घरांची विक्री करण्यासाठी खासगी संस्थेसाठी 699 कोटी रुपयांची काढलेली निविदा यावर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे नागपूर, पुणे महानगरपालिकेचीही चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -