घरमुंबईशिवभक्तांच्या २३ कोटी रुपयांची दलाली द्यायची का?

शिवभक्तांच्या २३ कोटी रुपयांची दलाली द्यायची का?

Subscribe

खासदार संभाजीराजे यांचा सवाल,‘मातोश्री’वर मुख्यमंत्र्यांची भेट

रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. मात्र, याच राजधानीच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन 2 वर्षे झाले, तरीही गडाचे काम 1 टक्काही झाले नाही. या कामासाठी 16.50 टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजेच शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलाली द्यायची का? असा सवाल संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

रायगड संवर्धनाच्या कामांबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगड संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरु आहेत. मात्र, रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचे काम सुरु असून महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आज मुख्यमंत्र्यांना भेटून मी माझी अस्वस्था त्यांना सांगितली. तसेच, असे काम होणार असेल तर मला या जबाबदारीमधून मुक्त करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.

- Advertisement -

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला रायगड संवर्धनाचे काम तुम्हीच करा. हे काम तुमच्याशिवाय दुसरे कुणी करू शकणार नाही, असे सांगितले. याशिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपण संबंधित सर्वांना एकत्र बोलावून बैठक घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करु. तसेच, भ्रष्टाचार होत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. याचबरोबर, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणचा लढा याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -