घरमुंबईअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा, अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा, अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ

Subscribe

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. १८ ते २० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.

लॉकडाऊनमुळे ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेचा अर्ज भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. १८ ते २० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे अर्ज न भरणार्‍या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळून ते परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विद्यापीठामध्ये गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील,संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेला विद्यार्थी मुकला जावू नये यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्याचे आवाहन विद्यापीठाला केले. त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख ४७ हजार ५०० आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे १ लाख ७० हजार विद्यार्थी असून उर्वरित ७२ हजार ५०० विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले.

- Advertisement -

२५ सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा

मुंबई विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून सुरू केल्या आहेत. तर २५ सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -