घरमुंबईसरकार नोकर भरती कधी करणार?

सरकार नोकर भरती कधी करणार?

Subscribe

नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल

राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील 5 ते 6 वर्षांत सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. सरकारने सांगितलेल्या रिक्त पदांचा आकडा कमी असून रिक्त पदांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. गेल्या 5-6 वर्षांत एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचार्‍यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचार्‍यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

राज्यात 2 लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर यापदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -