घरमुंबईप्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी रेल्वे पादचारी पूल उभारणार

प्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी रेल्वे पादचारी पूल उभारणार

Subscribe

आणखी १० कोटींची तरतूद

‘मुंबईची लाईफलाइन’ अशी ओळख असणार्‍या उपनगरी रेल्वेचा प्रवास धोकादायक बनत असून अपघातांची दिवसेंदिवस वाढती संख्या रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होत आहेत. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडून होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात आणखी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात रेल्वेतून प्रवास करताना विविध अपघातात दोन हजार ९८१ प्रवाशांचा मृत्यूू झाला, तर तीन हजार ३४९ प्रवासी जखमी झाले. सर्वाधिक एक हजार ६१९ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला. या अपघातांना सुरक्षा उपाययोजनांचा अभाव कारणीभूत ठरत होता. त्यामुळे रेल्वेने हे अपघात रोखण्यासाठी पादचारी पूल उभारण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षी या कामासाठी 40 कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पुलांच्या कामांना वेग येणार असून यामध्ये हार्बर मार्गावरील स्थानकांचीही निवड करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे पादचारी पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम सध्या थांबविण्यात आले आहे, परंतु पावसाळा संपताच या पुलांच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी 2019 रोजी सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये 125 पादचारी पूल उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवरील दादर, विक्रोळी, मुलुंड, टिटवाळा, आटगाव, उल्हासनगर, कसारा, आंबिवली, वाशिंद व हार्बरवरील गोवंडी, टिळक नगर स्थानकात पादचारी पूल उभारले जाणार आहेत. याशिवाय आसनगाव, शिवडी, मुंब्रा, मस्जिद स्थानक, भांडुप, दादर, दिवा, ठाणे यासह आणखी काही स्थानकांतील पुलांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -