घरताज्या घडामोडी'म्हणून भाजपला भारतरत्न तर इतरांना पीएचडी पदवी दिली पाहिजे'

‘म्हणून भाजपला भारतरत्न तर इतरांना पीएचडी पदवी दिली पाहिजे’

Subscribe

'टीका करण्यासाठी भाजपला भारतरत्न तर काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे',असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘टीका करण्यासाठी भाजपला भारतरत्न तर काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे’,असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. कारण भाजपचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात. त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, अशी टीका करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा व्हायरस समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आणि मुंबईत खबरदारी म्हणून २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. यावरुन भाजपाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे? हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं’, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -

आम्ही लढायला तयार आहोत

‘तीन पक्ष एकत्र कधी लढतील मी वाट बघतोय आम्ही लढायला तयार आहोत’,असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, विधानपरिष पदवीधर निवडणुकीत आम्ही एक छोटी लढाई केली आमि ती जिंकलो. त्यावेळी देखील तीन पक्ष एकत्रच होते. त्यामुळे पुढेही ते एकत्रच असतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकांच्या काळजीसाठी घेतले जातात निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांची काळजी घेण्यासाठी निर्णय घेत आहेत. सरकार हतबल झाले आहे ते दिल्लीत महाराष्ट्रात नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे मोदी सरकारची हतबलता दिसून येत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशी हतबलता मी गेल्या ५० वर्षात पाहिलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

हेही वाचा – भाजप बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -