मुंबई : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडके बाप्पा आपल्या ‘गावाला’ निघाले आहेत. मुंबईतील लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, तेजुकाया मेन्शन, गिरगावचा राजा, परळचा राजा असे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांना गुरुवारी सकाळपासूनच सुरुवात झाली.
- Advertisement -
मुंबईत एका पाठोपाठ एक अशा मोठ-मोठ्या गणेशमूर्तींची मिरवणूक निघाली आहे.
- Advertisement -
हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांची प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली आहे.
गणरायाचे मनमोहक रूप प्रत्येक जण आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत आहे.
गेले दहा दिवस ‘श्रीं’ची मनोभावे पूजा केल्यानंतर ‘पुढच्या वर्षी लवकर या…’ असा प्रेमळ आग्रह भक्तगण करताना दिसत आहेत.