“जुडेगा भारत… जितेगा इंडिया”चा नारा देत देशातील 28 पक्षांचे 63 प्रमुख नेते मुंबईत उपस्थितीत आले होते. इंडियाची ही दोन दिवसीय बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेल असलेल्या ग्रँड हयातमध्ये पार पडली. या बैठकीत इंडियाची पुढच्या रणनिती ठरवण्यात आली आहे. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आदी नेत्यांनी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
इंडियाच्या मंचावर जे लोक उपस्थितीत आहेत. हे सर्व जण देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आम्ही सर्व जण एकत्र येऊन निवडणुका लढवू. तर भाजप निवडणुका पराभव निश्चित आहे, अशा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्यक्त केला आहे.
चुकीच्या मार्गावर जाणाऱ्यांना चांगल्या मार्गावर आणू. पण जे येणार नाहीत त्यांना दूर करण्याचं काम आम्ही खांद्याला खांदा लावून करु, असे शरद पवार म्हणाले.
‘इंडिया’ची ही दोन दिवसीय बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेल असलेल्या ग्रँड हयातमध्ये पार पडली.
अहंकारी सरकार कधीच सत्तेत आले नव्हते. हे स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजायला लागले आहेत. त्यामुळे यांचा नाश आम्हीच करणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
“मणिपूर जळत असताना, कोरोनामध्ये विशेष अधिवेशन बोलावले नाही”, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
आतासुद्धा खोटे बोलत आहेत आणि लोकांना मूर्ख समजत आहेत. परंतू आता तसे होणार नाही कारण, आम्ही एकत्र आलो असून, मोदींना हटवूनच विश्रांती घेणार असे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केले
“मणिपूर जळत असताना, कोरोनामध्ये विशेष अधिवेशन बोलावले नाही”, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
मुंबई - शुक्रवार रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात मान्सून अतिसक्रिय झाला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे.
राज्यातील अनेक भागात मुसळधार...