भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याची सुरूवात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी केली. दोघांनीही भारताला सावध आणि चांगली सुरूवात करुन दिली. परंतु शिखर धवनला मोठी खेळा करता आली नाही. शिखर ४० चेंडूत ३८ धाव करुन बाद झाल्यानंतर रोहितने सामन्याची सुत्रे हाती घेतली. धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार विराट कोहली लगेच बाद झाला. लागोपाठ तीन शतके केल्यानंतर आज पुन्हा विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराट १७ चेंडूत १६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूने रोहितला चांगली साथ दिली. रायुडूनेदेखील अर्धशतक झळकावले. रोहितने रायुडूसोबत चांगली भागिदारी करत भारताचे अडीच शतक फलकावर लावले आहे. त्यासोबत त्याने वैयक्तिक शतकही साजरे केले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या आहेत. या खेळीत १५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. भारताच्या खात्यावर आता ४० षटकात २५५ धावा जमा झाल्या आहेत. रायुडूनेदेखील ६२ चेंडूत ७० धावा केल्या आहेत.
वाचा – सचिनने ‘ती’ बेल वाजवली आणि आजचा सामना सुरू झाला
Top man! HITMAN!!@ImRo45 brings up his 21st ODI ton, second ? in the series so far ?? #INDvWI pic.twitter.com/Vfrzz26Uxw
— BCCI (@BCCI) October 29, 2018
?MAN!
What an innings this has been from the HITMAN!!@Paytm #INDvWI pic.twitter.com/NoRImtbR7B
— BCCI (@BCCI) October 29, 2018
वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत एक कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका भारताने जिंकल्यानंतर आता उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
A well deserved half-century for @RayuduAmbati
Brings up his 10th ODI FIFTY off 51 deliveries #INDvWI pic.twitter.com/LdT9o5HQFD
— BCCI (@BCCI) October 29, 2018