गेल्या दोन महिन्यांपासून दिग्गज खेळाडूंच्या साक्षीने रंगलेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. आयपीएलच्या अंतिम लढतीत तुल्यबळ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज भिडणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे दोघांकडे जेतेपदाचा ‘चौकार’ मारण्याची संधी आहे. आता यावेळी कोणता संघ बाजी मारतोय याची उत्सुकता लागली आहे. चेन्नईचा संघ आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत तीन फायनल लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईने दोन वेळा चेन्नईला पराभूत केले आहे. एकदा धोनीच्या संघाकडून मुंबईचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून रोहित १०० टक्के यशस्वी ठरला आहे. २०१०मध्ये मुंबईचा फायनलमध्ये पराभव झाला होता, पण त्यावेळी सचिन तेंडुलकर कर्णधार होता. या मोसमात चेन्नई आणि मुंबई तीन वेळा आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी रोहितच्या संघाने बाजी मारली आहे.
आयपीएलचा अंतिम सामना आज रंगणार
written By My Mahanagar Team
Mumbai
मुंबई इंडियन्स वि.चेन्नई सुपरकिंग्ज
मागील लेख
पुढील लेख
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -