घरठाणे431 ग्रामपंचायतींमध्ये फटाके न वापरण्याचा ठराव

431 ग्रामपंचायतींमध्ये फटाके न वापरण्याचा ठराव

Subscribe

‘माझी वसुंधरा, अभियान 4.0’ अंतर्गत पंचतत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद ठाणे मधील 431 ग्रामपंचायतीमध्ये फटाके न वापरण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. यामुळे वायू प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण प्रतिबंध होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरण व जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे. वायु प्रदुषण लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान 4.0 राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींना फटाके न वाजवता पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्यासाठी ठराव घेऊन ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली आहे.

वायु, जल, आकाश, पृथ्वी, अग्नी या पंचतत्वानुसार पर्यावरणास हानी होणार नाही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पंप, वृक्षलागवड, बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल युज प्लास्टिक बंदी असे उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच पर्यावरण दूत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -