- Advertisement -
बिग बॉसच्या घरामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीच्या शपथा घेणारे सदस्य कुठवर ही मैत्री जपतील हे येणार्या दिवसांमध्ये कळणार आहेच. ग्रुपमध्ये देखील आता फुट पडण्यास सुरुवात झाली आहे. विकास – विशालनंतर आता कुठेतरी मीरा आणि गायत्रीमध्ये देखील दुरावा येत आहे असे दिसते आहे. मग काल मीराने उत्कर्ष, दादूस आणि जयसमोर तिचे मनमोकळे करणे असो वा मग त्यांची आजची चर्चा असो. आता आजची ही चर्चा नक्की गायत्रीवरुनचं आहे की मीरा आणि उत्कर्ष कोणा दूसर्या सदस्याबद्दल बोलत आहेत हे आजच्या भागामध्ये कळेलच.
- Advertisement -