- Advertisement -
भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस गांधी शांती यात्रा काढत आहे. मुंबईत ९ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया इथून या यात्रेची सुरुवात होईल. २१ दिवस सहा राज्यातून प्रवास करत ही यात्रा ३० जानेवारी रोजी दिल्लीत राजघाटावर समाप्त होईल. देशभरात सध्या अशांततेचे वातावरण आहे, त्यामुळे शांती यात्रेची गरज असल्याचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
- Advertisement -