- Advertisement -
“स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील लोक भलतीसलती कामं करत नाहीत, ठाकरेंच्या रक्तात घाणेरडी कामं करण्याची वृत्तीच नाही. आजकाल आदित्य ठाकरे यांच्यावर जे आरोप लावले जात आहेत, ते निव्वळ राजकारणातून लावले जात आहेत. मात्र आदित्य ठाकरेंनी यापुढे सांभाळून राहण्याची गरज आहे, आपले मित्र आणि नातेवाईक यांना फार जवळ न ठेवता आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे, ते राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात”, अशी भूमिका प्रसिद्ध ज्योतिषी पंडीत राजकुमार शर्मा यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला फेसबुक लाईव्ह दरम्यान व्यक्त केली.
- Advertisement -