- Advertisement -
‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला’, असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Advertisement -